Tuesday, February 26, 2008

‘ तारें..’ पाहिल्यानंतर !

अचानक कुणीतरी सण्णकन कानाखाली वाजवून गेल्यासारखं सुन्नं झालंय! ‘तारें जमीन पर’ पाहून दोन दिवस झाल्यानंतरही !!!

काय पाहिलं, काय आठवतंय, सांगायचं तरी काय काय आणि दाद तरी कशा कशाला द्यायची?

‘तारें…’ची कथा लिहिणाऱ्या अमोल गुप्तेला की त्याच्यातल्या समाजसेवकाला….
निर्माता / दिग्दर्शक आमीर खानला की ‘राम शंकर निकुंभ’ला….
‘मैं कभी बतलाता नहीं, पर अंधेरेसे डरता हूं मैं मॉं…..तुझे सब हैं पता, हैं ना मॉं’ लिहिणाऱ्या प्रसून जोशीला….
त्या ओळींचा अर्थ आपल्या आतपर्यंत पोचेल असं संगीत देणाऱ्या शंकर – एहसान – लॉय ह्या त्रिकुटाला…
आपल्याला सिनेमातलेच एक पात्र बनवतील अशा कॅमेऱाच्या अँगल्सना…
कपडे, रंग, hair style सगळ्यातून perfect वातावरण उभं करण्याला…
तिच्या चेहऱ्यावरची, पिल्लासाठीची, घालमेल आपल्या मनात उतरवणाऱ्या टिस्का चोप्राला…
आणि तो बोलक्या डोळ्यांचा टिल्लू दर्शिल सफारी? फिल्मफेअरवाले काहीही म्हणोत, आपण तर दर्शिल सफारीला ह्या वर्षीचा best actor मानलं !

‘तारें ..’ पाहिल्यानंतर ट्युलिपला तिच्या ब्लॉगवर लिहायला सुचेनासं का झालं ते स्वत: सिनेमा पाहिल्यावर लगेच समजलं ! अजून पाहिला नसेल तर लगेच ‘तारे जमीन पर’ पहा !!! हा ब्लॉग पुरेसा नसेल तर एक मिनिट हा सीन पहा. एखादी कलाकृती अशी असते की तिच्याबद्दल फार बोलण्यात वेळ घालवू नये ! कधी कधी शांततेवर शब्दांचे ओरखडे काढू नयेत !!!

मनात हुरहूर साठलीय … कडकडून टाळ्या वाजण्याआधी एक स्तब्ध शांतता असते ना तशी !

Saturday, February 16, 2008

शादी से पहले और शादी के बाद

शादी से पहले हाथों में हाथ
लब्जों में भी खूब मिठास
घंटोंतक चले फोनपे बात
हर शाम उन्हें मिलने के बाद….

आसमान में हो नीला रंग
या फिर बरखा का मौसम
एक छोटासा, कप कॉफी का
होता था दीवानोंके संग….

शादी होते ही सबकुछ बदला
उनका तो ना सिर्फ नाम बदला
घर आते हैं शाम को अब हम
लिए हाथ में सब्जी का थैला…

बातें अब भी होती हैं
घंटोंतक वे चलती हैं
घरखर्चा और बच्चोंकी फीस
जेब में क्या कुछ बाकी है?

ऐसा नहीं के प्यार हुआ कम
बस कहने की फुरसद नहीं
बात अगर हों नजरोंसे तो
फिर कहने की जरूरत नहीं !!!

Saturday, February 2, 2008

यादों की बारात (मराठी)

काय दिवस होते ना ते शाळकरी वयाचे?
पाखरांमागे धावताना फुलपाखरू होण्याचे…

सकाळ, दुपार, संध्याकाळ..वेगवेगळ्या तासांचे
आनंद, कंटाळा, मस्ती अशा भाव आणि भावनांचे
गणिताच्या पायाचे, कवितेच्या झुल्यांचे
जीव-भौतिक-रसायनच्या इति-भूगोल-नाशाचे…. १

टोपणनावांनी
हाक मारून सगळ्यांना बोलवायचे
दंगा-मस्ती करताना तहान-भूक विसरायचे
तसे निरागस होते दिवस पण बिलंदरही बनायचे
गृहपाठ नाही केला तर, “वही विसरलो” सांगायचे… २

पाठीवरच्या धपाट्याने अपमानित व्हायचे
“लहानपण देगा देवा”, अग्गदी खोटं वाटायचे
चांगलं काही केलं तर करडे डोळे निवळायचे
तीच पाठ, तोच हात.. अभिमान मिरवायचे… ३

मधल्या सुट्टीचे खेळ, आधीच्या तासांना ठरवायचे
रडीचा डाव खेळला तर कडकडून भांडायचे
सुट्टी संपण्याआधी मात्र सगळं विसरून जायचे
आपल्या डब्यांची बिनधास्त वाटावाटी करायचे… ४

आवडीच्या तासाला अगदी मनापासून रमायचे
नाटकाच्या तालमींना सगळ्यांआधी पोचायचे
मुलामुलींनी एकमेकांशी बोलणेही टाळायचे..पण
अर्ध्या कळत्या वयातले स्वप्नं रेशमी गुंफायचे… ५

किती धन गोळा करतोय, तेव्हा नाही समजायचे
अजून काय घेऊ शकू, तेही नाही उमगायचे
पण खरंच… काय दिवस होते ना शाळकरी वयाचे?
पाखरांमागे धावताना फुलपाखरू होण्याचे…
पाखरांमागे धावताना फुलपाखरू होण्याचे… ६